बोध कथा

मनःशांती

अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, ” स्वामीजी तासन् तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.” त्यावर स्वामीजी म्हणाले, ” सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणार्‍या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.” यावर त्या तरुणाने त्यांना, ” एखाद्या रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?” असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, ” तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत. हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.”

Incoming search terms:

  • बोध कथा
  • बोध
  • मराठी बोध कथा
  • थॉमस अल्वा एडिसन
  • ध्यानधारणा कशी करावी
बोध कथा

स्वच्छतेचा वसा

गणपतचा खानावळीचा व्यवसाय अगदी जोरात सुरु होता पण काही दिवसांनी रमणने त्यांच्याच शेजारी नवी खानावळ सुरु केली आणि गणपतची खानावळ पार बसली. त्याला रोज ग्राहकांची वाट पाहावी लागे. एके दिवशी गणपतचा मित्र राम त्याच्याकडे आला तर गणपत एकदम निराश बसलेला दिसला. त्याने कारण विचारताच गणपतने त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यावर राम त्याला म्हणाला, अरे, काही सांगतो त्यावरुन तू लक्षात घे, तुझे काय चुकले ते. माझ्या ओळखीच्या एका तरुणाने अगदी सुंदर सुशिक्षित मुलगी नाकारली केवळ तिने विटलेली साडी नेसली होती आणि केस बांधले नव्हते या कारणामुळे. तू पण तीच चूक करतो आहेस, त्या मुलगीसारखा. तुझ्या खानावळीत जो चवीचा स्वयंपाक होतो तो रमणच्या खानावळीत होत नसला तरी त्याच्या खानावळीची स्वच्छता आणि टापटीप ग्राहकाला खेचत आहे. तू देखील बदल केलास तर तुझी खानावळ पुन्हा जोरात चालेल, यात शंका नाही. गणपतला आपली चूक उमगली.

Incoming search terms:

  • बोध कथा मराठी sope
  • स्वच्छतेवर
बोध कथा

समर्पण

एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, ” महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.” साधू म्हणाला, ” जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?” पांडुरंग म्हणाला, ” अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. ” हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, ” जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.”

बोध कथा

मनाची एकाग्रता

पांडुरंग ‘ मनाची एकाग्रता कशी करावी ‘ या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, ” महाराज आपण हे काय करता आहात ?” सहदेव म्हणाले, ” मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.” पांडुरंग म्हणाला, ” महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.” ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, ” मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?

Incoming search terms:

  • जर आरसा नसेल तर
बोध कथा

एडिसन

जगदविख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या प्रयोगशाळेला १९१४ मध्ये आग लागली. या आगीत त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रे, यंत्रसामग्री जळून खाक झाली. या आगीची वार्ता समजताच त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन त्यांना भेटायला, मदत करायला धावत आला तेव्हा थॉमस एडिसन त्याला म्हणाले, ” अरे पाहत काय उभा राहिलास ? तुझ्या आईला चटकन बोलावून आण. असे दृश्य पुन्हा पाहायला मिळणार नाही.” दुसर्‍या दिवशी आपल्या आशा – आकांक्षांची आणि स्वप्नांची झालेली ती राखरांगोळी पाहताना ते म्हणाले, ” सारी सामुग्री नष्ट होण्याचे खूप फायदे झाले. त्यामुळे माझ्या चुकाही जळून खाक झाल्या. आता मी नव्या जोमाने कामाला सुरुवात करु शकेन. एका अर्थी ही परमेश्वराची कृपाच म्हणायची !”

Incoming search terms:

  • एडिसन